रविवार, २२ मे, २०१६

नाती

नाती
नाही जगवता आली आपल्याला
जगताही नाही आलीत.
प्रवासात ...
मैलाची दगडे खुप आलीत
पण...
अंतरे मोजता नाही आली.

थकलो शीण आला
जरा विसावाही घेतला.
सोबत बांधून आणलेली शिदोरी
संपली तशी पुन्हा बांधूनही  घेतली.
पण...
प्रत्येक आलेल्या वळणावर
मिळालेल्या नात्यांची
गोडी कधी चाखता नाही आली.

आता कधी कधी,
गोंजारत कुरवाळत
विचारत असतो ह्या आत्म्याला,
"हे सारं करून काय कमावलेस?
आणि काय गमावलेस?"

तोही मख्ख!
आता उत्तर देइनासा झालाय.
कळले का तुला !
एकटंपण फार वाइट असतं.

-भूराम
5/22/2016